Saturday, December 19, 2009

कवी असण्याचे side effects (चांगले आणि वाईट)

* कवींबद्दल लोकांची अशी समजूत असते की ते सगळेच शामूळ, कच्च्या दिलाचे, सगळ्या decisions डोक्याने विचार न करता emotionally घेतात etc
- मला असे काही कवी माहिती आहेत जे कठीण कोडी पण सोडवू शकतात (डोक्याने विचार करुन), real life मध्ये पण खूप successful आहेत, खुप पैसा पण कमवतात (मला थोडा वेळ द्या, मी पण कमवण्याच्या मार्गावरच आहे :) )

* प्रेमकविता तर आहेतच पण प्रेमभंगासारखे किंवा पराभवाचे दु:ख कवितेत सहजतेने व्यक्त करता येते :)
त्यामुळेच कवी लोकांमध्ये दारु सारखे व्यसन असणारे किंवा आत्महत्येसारखा अखेरचा विचार करणारे खूप कमी असावेत :)
माझ्या आयुष्यातले असे काही प्रसंग आठवतात की एखाद्या घटनेमूळे १-२ दिवस डोकं सुन्न झालं.. सुखाचे, दु:खाचे किंवा ज्यांना out of this world असे म्हणता येईल असे प्रसंग...
तेव्हा काहीच शब्द पण सुचले नाहीत, पण मग त्या strong भावना व्यक्त करायला वाक्यांऐवजी direct कविताच सुचली!
कविता एक प्रकारची emotionally balanced personality देतात आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात असं मला वाटतं.
कोणीतरी कुठेतरी म्हटलंच आहे की मनाच्या संवेदनशीलतेही एक सामर्थ्य असतं

* अजुन एक side effect: तुम्ही दुसर्‍या प्रकारच्या कितिही कविता लिहा, त्यांच्या real life च्या relation बद्दल कोणी जास्त विचारणार नाही.
पण..पण..तुम्ही एखादी romantic कविता लिहिलीत की direct confidently प्रश्न विचारला जातो की,
"काय मग, कोण आहे ती? नाव तर सांग"
किंवा "पुढे काय झालं?"
किंवा "ही या कवितेतली आपल्या office मध्ये तिथे बसणारी हीच का?" :-)

मग मी कितीही सांगीतलं की कविता बर्‍याचदा काल्पनिक असू शकतात तरी लोकांचा romantic कवितेबद्दल तर मुळीच विश्वास बसत नाही!
अशावेळी मग मी भाव खाऊन सांगतो की ही कविता खरी की काल्पनिक ते माझं secret आहे ;-)

No comments: